Saturday, 25 June 2016

'''स्मार्ट सिटी' असो वा 'अमृत सिटी', महाराष्ट्र आघाडीवरच''


पुणे : ‘स्मार्ट सिटी उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील दहा शहरांचा समावेश झाला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील दोन शहरे आहेत. जगातील अनेक देश विकासासाठी इथे पैसे गुंतविण्यास तयार आहे. इतर शहरांच्या विकासासाठी केंद्र सरकारनेही मदत केल्यास या प्रकल्पाला गती मिळू शकते,‘ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) केले. ‘स्मार्ट सिटी‘ असो वा ‘अमृत सिटी‘, महाराष्ट्र सदैव आघाडीवरच असेल,
असा विश्‍वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ‘शहर विकासाची जबाबदारी केवळ महापौर किंवा आयुतांची नाही. सर्व नगरसेवक आणि सर्वपक्षीयांनी मिळून विकासासाठी काम केले पाहिजे; तरच आपण विकास प्रत्यक्षात आणू शकतो,‘ असे प्रतिपादन केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी केले. ते म्हणाले, "केवळ हॅट-बुट-कोट-सुट म्हणजे ‘स्मार्ट‘ होत नाही. लोकांचे जीवन सुखदायी आणि जगण्यायोग्य करणे म्हणजे ‘स्मार्ट‘. पुण्यात अनेक ऐतिहासिक गोष्टींची सुरवात झाली आहे. मुंबई ही राज्याची आर्थिक राजधानी आहे; पण ‘हृदय‘ पुणे आहे. पुणे असो वा भुवनेश्‍वर किंवा सोलापूर, सगळ्याच ठिकाणी ‘स्मार्ट सिटी‘विषयी भरपूर उत्साह दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी यांना विविध क्षेत्रांमध्ये बदल घडवायचे आहेत, जेणेकरून सर्वांगीण विकास होऊ शकेल.‘‘

No comments:

Post a Comment